देगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत असताना उदगीर येथील मूळ रहिवासी असलेल्या अंध विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांततेत मोर्चा
उदगीर : देगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत असताना उदगीर येथील मूळ रहिवासी असलेल्या अंध विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी उदगीरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’ युवा संघटनेच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या सूचनेनुसार आणि उदगीर तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर सायंकाळी सात वाजता शांततेत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिला, युवती, युवक तसेच समस्त उदगीरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कॅन्डल मार्चचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या कॅन्डल मार्चच्या आयोजनासाठी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे, शहराध्यक्ष करण कांबळे, तालुका कार्याध्यक्ष बळीराम गायकवाड, शहर कार्याध्यक्ष सागर मोरे, तालुका उपाध्यक्ष जावेद सय्यद, संदीप गायकवाड, अक्षय गायकवाड, लक्ष्मण कांबळे, प्रीतम कांबळे, सुनील कांबळे, महेबुब शेख, किरण सूर्यवंशी, धनराज वाघमारे, शिल्पा कांबळे, पंचशीला कांबळे, शालुबाई हंडीशेरे, प्रतिभा कांबळे, ज्योती कांबळे आणि कविता कांबळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.