Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

तारपीन पाणी समजून पिल्याने २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूर मधील वाठोड्यात हृदयद्रावक घटना

नागपूर शहरातील वाठोडा भागात एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


तारपीन पाणी समजून पिल्याने २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू नागपूर मधील वाठोड्यात हृदयद्रावक घटना

Turpentine Poisoning |

नागपूर (Turpentine Poisoning) : नागपूर शहरातील वाठोडा भागात एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाणी समजून चुकून तारपीन (टर्पेंटाइन) पिल्याने अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला असून, यामुळे कुटुंबासह परिसरात शोक वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडगाव येथे घडली. मृत बालकाचे नाव अद्वविक शाम भदाडे असे आहे. त्याचे वडील शाम भदाडे हे केटरिंगचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी तारपीन आणण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर उरलेली तारपीनची बाटली घरातील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अद्वविक घराबाहेर खेळत होता.

खेळत असताना तो स्टोअर रूमजवळ गेला. तिथे ठेवलेल्या बाटलीतील द्रव पदार्थ पाणी असल्याचा गैरसमज होऊन त्याने ते प्राशन केले. तारपीन पिताच त्याची तब्येत अचानक बिघडू लागली आणि काही वेळातच तो अस्वस्थ झाला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असतानाच या निरागस बालकाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भदाडे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. किरकोळ निष्काळजीपणामुळे एवढी मोठी दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाठोडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या धोकादायक रसायनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तारपीन, आम्ल किंवा कीटकनाशके यांसारखे विषारी पदार्थ लहान मुलांच्या आवाक्याबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच अशा पदार्थांच्या बाटल्यांवर स्पष्ट सूचना लिहिणे, त्यांना कुलूप लावून ठेवणे किंवा मुलांना सहज पोहोचणार नाही अशा उंच ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पालकांची थोडीशीही दुर्लक्षता जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे.

Related to this topic: