Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

श्रीराम बांगर

स्वच्छता कामगारांनी वेळेत कामावर हजर राहावे, अन्यथा कठोर कारवाई

Shri Ram Bangar: नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर यांनी स्वच्छता कामगारांना वेळेवर कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


स्वच्छता कामगारांनी वेळेत कामावर हजर राहावे अन्यथा कठोर कारवाई

Shriram Bangar |

 

नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर यांचा इशारा

हिंगोली (Shriram Bangar) : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू नयेत, यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगारांनी आपल्या निर्धारित वेळेत कामावर हजर राहून चोख कर्तव्य बजावावे. कामात कसूर करणाऱ्या किंवा विनाकारण दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर (Shriram Bangar) यांनी दिला आहे.

वेळेचे पालन करणे अनिवार्य
शहराच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही कर्मचारी वेळेवर कामावर उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीराम बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जनतेचे आरोग्य आमच्यासाठी प्राथमिकता आहे. जर स्वच्छता कर्मचारी वेळेवर आले नाहीत, तर कचरा साचून दुर्गंधी पसरते. त्यामुळे प्रत्येक कामगाराने बायोमेट्रिक हजेरी आणि नेमून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे," असे त्यांनी (Shriram Bangar) स्पष्ट केले.

नियमित देखरेख आणि पाहणी
स्वच्छता निरीक्षकांनीही प्रत्येक प्रभागात जाऊन कामगारांच्या उपस्थितीची नोंद घ्यावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहतील किंवा कामात टाळाटाळ करतील, त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावर दंडात्मक तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही बांगर (Shriram Bangar) यांनी नमूद केले.

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
पावसाळा जवळ येत असल्याने नाल्यांची सफाई आणि कचरा संकलन वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात कुठेही कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत याची काळजी स्वच्छता विभागाने घ्यावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान, नगरसेवक कपिल खंडेलवाल, खली बांगर विशाल गोटरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

Related to this topic: