Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आमदार संतोष बांगर

“संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला वळंबा”; आमदार संतोष बांगर यांचा हल्लाबोल

MLA Santosh Bangar: हिंगोळ्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे गटाकडे संजय राऊत या नामांकनावर जोरदार टीक्याच्या आघाडीवर असलेल्या आरोपांचे उल्लेख


“संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला वळंबा” आमदार संतोष बांगर यांचा हल्लाबोल

MLA Santosh Bangar |

हिंगोली (MLA Santosh Bangar) : शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला वळंबा आहे, असा घणाघाती आरोप बांगर यांनी केला आहे.

यावेळी प्रसार माध्यमशी बोलताना हिंगोली चे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) म्हणाले की, खा.संजय राऊत यांच्या दररोजच्या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे गटाची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे. राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे बोलतात त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्यांची वक्तव्ये पक्षाला अडचणीत आणणारी ठरत आहेत.

आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांनी पुढे सांगितले की, संजय राऊत यांच्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि सामान्य जनतेचा विश्वासही उडत आहे. उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना वेळीच आवरले नाही तर पक्षाला आणखी मोठा फटका बसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली. ‘ऑपरेशन टायगर’नंतर राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचा पुनरुच्चार करताना बांगर यांनी विरोधकांना लक्ष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढीवरून हात फिरवला की विषय संपतो, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णय क्षमतेवर भर दिला.

Related to this topic: