बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकरी शंकर मेढे यांनी धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. कर्जाच्या भाराखाली दबून आणि अनेक समस्यांमुळे त्यांचा हा निर्णय.
पळसो बढे : बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील बहीरखेड येथील युवा शेतकरी शंकर रामकृष्ण मेढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेगाववरुन दोन किलोमीटर अंतरावर धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्ट्र पळसो बढे २ लाख कर्ज आहे, बाहेरील सुद्धा कर्ज असल्याची चर्चा आहे. हे कर्ज फेडता न आल्याने नैराश्य, पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे अतोनात नुकसान, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि मशागतीचा वाढता खर्च, तरुण वयातच कुटुंबाची जबाबदारी आणि आर्थिक अनिश्चितता आणि कजार्चा डोंगर, या टोकाच्या पावलामागील मुख्य कारणे असल्याचे बोलल्या जात आहे. मृतक शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे.