Saint Gajanan Maharaj Palkhi: शेगावचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे ३० जून रोजी रिसोड नगरीत आगमन होत आहे. या मंगलमयी पर्वाचे औचित्य साधून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारा
१० वर्षीय सुरभी ढगेचे मुखोद्गत पठण ठरले मुख्य आकर्षण
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भव्य सोहळा
रिसोड (Saint Gajanan Maharaj Palkhi) : शेगावचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे ३० जून रोजी रिसोड नगरीत आगमन होत आहे. या मंगलमयी पर्वाचे औचित्य साधून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आलेला 'श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण' सोहळा श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे एक अद्भुत केंद्र बनला. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन, आडते व खरेदीदार संघटना, तसेच हमाल आणि मापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात सुमारे १५०० भाविकांनी एकत्र येत श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे मनोभावे पठण केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर गजानन महाराजांच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला.
१० वर्षीय सुरभीचे मुखोद्गत पठण; भाविक मंत्रमुग्ध
या (Saint Gajanan Maharaj Palkhi) संपूर्ण महापारायणातील सर्वात मनमोहक, आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी क्षण तो होता, जेव्हा पुण्यातील अवघ्या १० वर्षांची प्रतिभावान मौखिक वाचक कुमारी सुरभी सुनील ढगे हिने व्यासपीठावरून संपूर्ण ग्रंथाचे मुखोद्गत पठण केले. तिच्या मधुर, स्पष्ट आणि दमदार आवाजातील पठणाने उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले आणि सर्वांचे डोळे कौतुकाने भरून आले.
शिस्तबद्ध नियोजन आणि महाप्रसाद
सकाळी ठीक १० वाजता या (Saint Gajanan Maharaj Palkhi) महापारायणाला प्रारंभ झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी या भक्तीमय पारायणाचे मुख्य आकर्षण सुरभी ढगेचे स्वागत केले. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यादरम्यान आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांसाठी चहा आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता पारायणाची सांगता झाली. यानंतर माऊलींची भव्य आरती करण्यात आली आणि उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळ्यादरम्यान रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला.

आयोजक व कार्यकर्त्यांचे कौतुक
या अभूतपूर्व आणि यशस्वी आयोजनाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, सचिव विजय देशमुख आणि सर्व संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी हमाल असोसिएशन व माहेश्वरी समाजाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सुरेखा तोष्णीवाल, शारदा काबरा, राधिका चितारका,प्रतीक्षा कोठुळे, पूनम गायकवाड, रूपा धूत, जया बाबर, अंकिता निर्बान, पवन चितारका, प्रकाश झंवर, सचिन रुहाटिया, महादेव कोठुळे आणि किसन अग्रवाल यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमातील भव्यता, कमालीची शिस्त आणि चोख व्यवस्थेबद्दल रिसोड परिसरातील भाविकांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले आहेत.