Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून अपुरी व चुकीची माहिती; माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप!

गट ग्रामपंचायत एकलारा, गुंडी व वाटोद येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती अपुरी, चुकीची आणि विलंबाने पुरवल्याचा आरोप अर्जदार अर्जुन मारोती खिरोडे यांनी केला आहे


ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून अपुरी व चुकीची माहिती माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप

RTI Act |

५ दिवसांत कारवाई न झाल्यास द्वितीय अपिलाचा इशारा!

मानोरा (RTI Act) : तालुक्यातील गट ग्रामपंचायत एकलारा, गुंडी व वाटोद येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती अपुरी, चुकीची आणि विलंबाने पुरवल्याचा आरोप अर्जदार अर्जुन मारोती खिरोडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, ५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करण्याचा इशारा दिला आहे.

अर्जदार खिरोडे यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. माहिती न मिळाल्याने त्यांनी दि. १० मार्च २०२६ रोजी प्रथम अपील दाखल केले. त्यानंतर ग्रामपंचायत सचिवांनी दि. २२ एप्रिल २०२६ रोजी माहिती दिली. मात्र, दिलेली माहिती अपुरी व चुकीची असून मुद्दाम विलंबाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सचिवांनी कव्हरिंग लेटरमध्ये अर्जदार माहिती घेण्यास टाळाटाळ करत होता, असा उल्लेख केला आहे. मात्र अर्जदाराने ९ महिन्यांनंतर अपील केले असल्याने ते माहिती घेण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होते. तसेच नमुना ८ अ आणि असेसमेंट रजिस्टर नमुना ८ अ यांच्या प्रती सविस्तर व क्रमाने न देता सचिवांनी जाणूनबुजून अपुरी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अर्जदाराने गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, आपल्या स्तरावरून तातडीने कारवाई करण्यात यावी. जर ५ दिवसांच्या आत कारवाई करून पत्राचे उत्तर दिले नाही, तर राज्य जनमाहिती आयोगाकडे द्वितीय अपील करण्यास आपण कायदेशीर पात्र राहू, असेही अर्जात नमूद केले आहे.

या प्रकरणामुळे ग्रामपंचायत स्तरावरील माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: