Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

रिक्षाचालक महामंडळ

रिक्षाचालकांवर महामंडळ नोंदणीची सक्ती थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन

Rickshaw Drivers Association: रिक्षाचालक संघटनेने परिवहन मंत्र्यांना निवेदन देऊन महामंडळ नोंदणीची सक्ती थांबवण्याची मागणी केली. अन्यथा, त्यांनी राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.


रिक्षाचालकांवर महामंडळ नोंदणीची सक्ती थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन

Rickshaw Drivers Association |

​टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे परिवहन मंत्र्यांना साकडे; आरटीओ प्रशासनाला निवेदन

​नांदेड (Rickshaw Drivers Association) : राज्यातील रिक्षाचालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा'च्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केली जाणारी सक्ती त्वरित थांबवावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 'ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती' आणि 'टायगर ऑटो रिक्षा संघटने'च्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन पाठवण्यात आले. नांदेडचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश शिंदे व दिनेश पाटील यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील २० वर्षांपासून रिक्षाचालक (Rickshaw Drivers Association) स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी करत होते. मात्र, शासनाने कोणत्याही प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता हे महामंडळ स्थापन केले. या मंडळासाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक फी बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अंधेरी, बोरीवली, कल्याण आणि नांदेडसह राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांमध्ये या महामंडळाची पावती असल्याशिवाय परवाना नूतनीकरण किंवा पासिंगची कामे केली जात नाहीत. प्रशासनाची ही भूमिका पूर्णपणे बेकायदेशीर असून रिक्षाचालकांवर अन्याय करणारी असल्याचे टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष अहेमद बाबा यांनी म्हटले आहे.

​कल्याणकारी महामंडळ नोंदणीच्या नावाखाली अडकवून ठेवलेली आरटीओची कामे तत्काळ सुरू करावीत. (Rickshaw Drivers Association) इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षांच्या अनिर्बंध नोंदणीमुळे स्थानिक रिक्षा व्यवसायावर गदा येत असून त्यावर त्वरित स्थगिती आणावी.अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने २३ मार्च रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्यामुळे, आता रिक्षाचालकांचे प्रश्न न सुटल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

​याप्रसंगी मराठवाडा कार्याध्यक्ष अहेमद बाबा, टायगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अहेमद , शहराध्यक्ष मुखिद पठाण, शेख तयब, गंगाधर सरोदे, संजय शेळके, मोहम्मद साबिर, वसीयुद्दीन इनामदार, शेख फारूख, सोनसळे मामा, लहुजी संघटनेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: