Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रिसोड स्व-जनगणना

प्रशासकीय नियोजन आणि लोकसहभागाचा विजय; पाचंबा गावाची शंभर टक्के 'स्व-जनगणना' पूर्ण

Resode Census 2027: शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्व-जनगणना' मोहिमेत रिसोड तालुक्यातील पाचंबा गावाने उल्लेखनीय यश मिळविले


प्रशासकीय नियोजन आणि लोकसहभागाचा विजय पाचंबा गावाची शंभर टक्के स्व-जनगणना पूर्ण

Resode Census 2027 |

 

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पुढाकाराला यश; रिसोड तालुक्यातील पहिले गाव ठरले मानकरी

रिसोड (Resode Census 2027) : शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्व-जनगणना' मोहिमेत रिसोड तालुक्यातील पाचंबा गावाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या अचूक नियोजनामुळे आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या गावाची शंभर टक्के स्व-जनगणना पूर्ण झाली असून, तालुक्यात या मॉडेलचे कौतुक होत आहे.

तहसील प्रशासनाने निवडलेल्या गावांमध्ये पाचंबा गावाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रतिसाद दिला. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी स्वतः या मोहिमेत पुढाकार घेऊन विविध स्तरांवर बैठका घेतल्या आणि नागरिकांना या (Resode Census 2027) प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्यात योग्य समन्वय घडून आला.

​या (Resode Census 2027) मोहिमेच्या यशात सरपंच शोभा जाधव, सरपंच प्रतिनिधी विष्णू जाधव, तलाठी विजया राऊत आणि मंडळ अधिकारी समाधान जावळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अंगणवाडी सेविका लता ताकतोडे व गीता ताकतोडे यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. यासह साईनाथ शिंदे, संतोष बिल्लारी, दिलीप पवार, अतुल डवरे, महेश जिरवणकर, किरण मोरे आणि शिवाजी कव्हर या टीमच्या परिश्रमामुळे अल्पावधीतच १०० टक्के नोंदणी पूर्ण होऊ शकली.