Risod Bazar Samiti: रिसोडच्या स्थानिक कृषी बाजार समितीने २२ मेपासून कामकाज बंद केले होते, परंत्ये शेतकऱ्यांची आर्थिक हानि कमीत कमी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत
रिसोड (Risod Bazar Samiti) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पत्रक काढून दिनांक २२ मे २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बाजार समितीचे कामकाज बंद राहील असे जाहीर केले होते. ऐन हंगामाच्या काळात बाजार समिती बंद असल्याकारणाने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. शेतकऱ्यांचे हेच हित लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोड तर्फे बाजार समिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रदेश संघटन मंत्री अभय खेडकर व जिल्हा अध्यक्ष जुगल किशोर कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन (Risod Bazar Samiti) बाजार समितीचे सभापती व सचिव यांना सादर करण्यात आले.
२९ मे पासून बाजार समिती सुरू करण्याचे आश्वासन
बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांची होणारी कोंडी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर व सचिव विजय देशमुख यांनी हे निवेदन स्वीकारले. तसेच, सकारात्मक चर्चा करून दिनांक २९ मे पासून बाजार समिती पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रिसोड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवेदन देतेवेळी उपस्थित पदाधिकारी:
या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते:
प्रभाकर पाटील (रिसोड तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत)
संतोष वाघमारे (ग्राहक संरक्षण परिषद)
जयंत वसमतकर (जिल्हा कोषाध्यक्ष)
अरुण लोथे (तालुका उपाध्यक्ष)
विजय देशमुख (तालुका सचिव)
सतीश मांदळे (कार्यालय मंत्री)