पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे पातूर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
पातूर : पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे पातूर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या यात्रेत पातूर शहरातील शेतकरी, गोसेवक, गोरक्षक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
२२ जून ते ५ जुलै या कालावधीत राज्यातील ३६ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणारी ही संवाद यात्रा गोसंवर्धन, गोपालन आणि गोसेवेबाबत जनजागृती करत असून आतापर्यंत २३ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून पातूर येथील डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात दाखल झाली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरणकुमार खंडारे, कर्मचारीवृंद, पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक डॉ. शिवकुमारसिंह बायस तसेच विविध सामाजिक संस्था आणि गोप्रेमी यांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा यांनी संवाद यात्रेचा उद्देश, गोवंश संवर्धनाचे महत्त्व आणि समाजातील जनजागृतीची आवश्यकता याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी संवाद यात्रेचे मुख्य सारथी नितीन चिलवंत, गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सुर्यवंशी, सदस्य उद्धव नेरकर, महाएनजीओ फेडरेशनचे मुकुंद शिंदे, स्वीय सहायक राहूल जगताप, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई सलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतीश सरोदे, प्रा. अतुल विखे, प्रा. व्ही. जी. वसू, डॉ. दिपाली घोगरे, प्रा. अरविंद भोंगळे, डॉ. संजय खांदेल, अनिल चव्हाण, चंद्रकांत अमानकर, प्रसिद्ध उद्योजक छोटू जोशी, निलेश धरमकार, धारकरी विजय राऊत तसेच अनेक गणमान्य गोभक्त नागरिक उपस्थित होते.