Rajiv Gandhi: आज देशावर आर्थिक संकट आहे, देशाच्या अर्थव्यवस्था ढासाळत आहे, डिझेल, पेट्रोल, गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, तरुणांना नोकरीची गरज आहे, अशा महा भयान संकटकाळात खऱ्या अर्थाने स्वर्गीय राजीव
स्व. राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या वतीने स्व.राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
चिखली (Rajiv Gandhi) : आज देशावर आर्थिक संकट आहे, देशाच्या अर्थव्यवस्था ढासाळत आहे, डिझेल, पेट्रोल, गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, तरुणांना नोकरीची गरज आहे, अशा महा भयान संकटकाळात खऱ्या अर्थाने स्वर्गीय राजीव जी गांधी यांची खऱ्या अर्थाने देशाला गरज आहे. ते देशाचे पंतप्रधान असताना देशावर किती तरी भयानक संकट आली, त्या संकटांना न घाबरता, त्यावर मात काढत स्व.राजीव जी गांधी (Rajiv Gandhi) यांनी केलेली क्रांती देश वाशी कधी विसरू शकत नाही. असे प्रतिपादन राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.समाधान भाऊ सुपेकर यांनी केले.
चिखली येथे आज राजीव गांधी (Rajiv Gandhi) पंचायतराज संघटनेच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना केलेल्या कार्याची आठवण करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान भाऊ सुपेकर नगर परिषद विरोधी पेक्षनेता डॉक्टर मोहंमद इसरार, अथरोधीन कझी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष जाकीर शेख, नगरसेवक गोकुळ शिंगणे, उभेद आली खान, डॉक्टर अमोल लहाने, गोपाल देव्हडे, रत्नदीप शिनगारे, संतोष देशमुख, आनंद बोन्द्रे, प्रशांत भटकर, योगेश वायाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे समन्वयक, ज्ञानेश्वर पचांगे,नजीरशेट कुरेशी, याया खान, भास्कर चांदोरे, शेख खैरू, राहुल चवरे, संजय गिरी, सिद्धार्थ मोरे, भारत खासभागे यांची उपस्थिती होती.