Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. प्रज्ञा सातव

केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीवर आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांची निवड

Dr. Pragya Satav: केंद्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीसाठी उच्चस्तरीय समिती तयार केली, ज्यात आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांना सदस्य म्हणून निवडले गेले आहे.


केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीवर आडॉप्रज्ञाताई सातव यांची निवड

Dr. Pragya Satav |

हिंगोली (Dr. Pragya Satav) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आगामी २०० वी जयंती २०२६ ते २०२८ पर्यंत  राष्ट्रव्यापी स्तरावर साजरी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशपातळीवर १२६ सदस्यांची एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित समितीत सदस्य म्हणून आ.डॉ. प्रज्ञाताई सातव (Dr. Pragya Satav) निवड करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी तसेच दोन वर्षांच्या या स्मरणोत्सवांतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे संचलन आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे व शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समता या विषयांवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाची आखाणी हि समिती करणार असून, या समितीत माजी राष्ट्रपती, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशातील सर्वोच्च धोरणकर्ते, पद्मश्री पुरस्कारार्थी, विविध तज्ज्ञ व प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे.

फुले दाम्पत्याचा समतेचा विचार देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी या माध्यमातून कटिबद्ध राहणार असल्याचे आ. डॉ. प्रज्ञाताई सातव (Dr. Pragya Satav) यांनी सांगितले व या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी मानले.

Related to this topic: