Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वाढोणा मृत्यू प्रकरण

वाढोणा येथील एकाच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप

Wadhona Murder case: वाढोणा येथील तत्कालीन ९ पोलिसांना बेंग्या नैनू पवार व राजू शेषराव पवार या दुवांच्यावर जन्मठेपचा आरोप सापडला. यानंतर रिसोड पोलिस ठाण्यातील अमानुष मारहाण


वाढोणा येथील एकाच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप 

Wadhona Murder case |

 

आरोपी म्हणून पकडून आणलेल्या बेंग्या  पवारचा  अमानुष मारहाणीत झाला होता मृत्यू 
रिसोड पोलीस ठाण्यातील घटना 
पोलीस विभागात प्रचंड खळबळ 

हिंगोली (Wadhona Murder case) : सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बेग्या नैनू पवार रिसोड पोलिसांच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षकासह ९ पोलिस कर्मचार्‍यांना वाशीमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश जयसिंग झपाटे यांनी २ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत  जिल्हा सरकारी वकिल श्रीराम काळू आणि अ‍ॅड. मनीष साकळे , अ‍ॅड. प्रताप नायक, अ‍ॅड. चेतन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बैग्या नैनू पवार व राजू शेषराव पवार या दोघांना रिसोड पोलिसांच्या पथकाने १० मे २०११  रोजी पहाटे साडेतीन वाजता संशयावर ताब्यात घेतले होते. त्या दोघांना चौकशीसाठी रिसोड पोलिस ठाण्यात आणल्या नंतर त्यांना प्रचंड मारहाण केली  या मारहाणीत बैग्या यांचा मृत्यू झाला होता. तर राजू गंभीर जखमी झाला होता. राजू यांंना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.बेग्याचे यवतमाळ दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी मयत बैग्या याच्या कुटुंबियांनी रिसोड पोलिस विरुद्ध तक्रार दाखल केली बेग्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुुन्हा दाखल नसतांना मुलास पोलिसांनी उचलून नेले व त्यांना गंभीर मारहाण करून खून केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यांनतर सदर प्रकरणाचा तपास वाशीम सीआयडीकडे सोपाविण्यात आला होता. सीआयडीचे तत्कालीन उपाधिक्षक अन्वर शेख यांनी रिसोड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सण जून २०११ मध्ये खून तसेच अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीच्या पथकाने केला होता. सीआयडीच्या पथकाने  तपास करून वाशीमच्या न्यायालयात दाषारोप पत्र सादर केले होते.

या प्रकरणात एकूण ४७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एकल्यानंतर न्यायालयाने रिसोड पोलिस ठाण्यातील तत्कालीन ९ पोलिस कर्मचार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  गुरुवारी २ जुलै गुरूवार रोजी न्यायाधिश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी  सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड. श्रीराम काळू यांनी काम पाहिले तर मयत बैग्या पवार याच्या वतीने हिंगोलीचे जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. मनिष साकळे यांनी काम पाहिले त्यांना अ‍ॅड. प्रताप नायक भगवतीकर, अ‍ॅड. चेतन अग्रवाल यांनी सहकार्य केले. 

तसेच त्यांना वाशिम गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक ममता अफुणे रिसोडचे पोलीस कर्मचारी शृंगारे, अमर ठाकूर व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीना पाथरकर यांचे सहकार्य लाभले. १५ वर्षानंतर मयत बेग्या नैनू पवार यांचे आई कलाबाई, वडील नैनू, पत्नी संजीवींनी पवार कुटूंबाला न्याय मिळाला. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक माधव धांडे, पोलिस कर्मचारी मदन पवार,रमेश पवार, हिरालाल ताराम, शिवाजी खिल्लारी, अशोक वैद्य, वसंत जाधव, नागोराव खांडके, पंजाब पाटकर यांचा समावेश आहे.

 अशी सुनावली शिक्षा
आरोपी माधव धांडे, शिवाजी खिल्लारी, नागोराव खंडके व वसंत जाधव यांना अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(२)(८) मध्ये ३ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अधिक २ महिने साधी कैद तसेच कलम ३(२)(२) मध्ये ५ वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद त्याचप्रमाणे कलम  ३(२)(७)  मध्ये ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

Related to this topic: