Selu Thiya Andolan: परभणीत सेलू तालुक्यातील परतूर-मानवत रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी करणारे नागरिक ठिय्या आंदोलन करत आहेत. वाढत्या अपघातांमुळे तात्काळ उपाय योजनांची गरज आहे.
आठ दिवसांत गतीरोधक बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचे आंदोलन मागे
परभणी (Selu Thiya Andolan) : सेलू तालुक्यातील परतूर-मानवत रोड हा राज्य महामार्ग सेलू शहरातून जात असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. वाढत्या रहदारीमुळे वारंवार अपघात घडत असून तात्काळ गतीरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने बुधवार ६ मे रोजी नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सातोना रोड ते परभणी रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे शाळा, महाविद्यालये, हॉटेल, दुकाने तसेच नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका या मार्गाचे सिमेंट रस्त्यात रूपांतर झाल्याने वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी निषेध व्यक्त करत सुमारे एक तास (Selu Thiya Andolan) ठिय्या आंदोलन केले.
अखेर अभियंता बळीराम माने यांनी येत्या आठ दिवसांत संबंधित मार्गांवर गतीरोधक बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या (Selu Thiya Andolan) आंदोलनात जयसिंग शेळके, शिवशंकर मोरे, संतोष निर्वळ, गोविंद हरणे, भरत शेरे, पवन नाईक, समाधान निर्वळ, नितीन होगे, वैभव शेरे, राजू नाईक, मुंजा गाडेकर, गणेश शेवाळे, अक्षय जोशी, विराट तिर्थे, माऊली लेवडे आदींनी पुढाकार घेतला.