Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीतील पाथरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर

पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळात शनिवारी (दि. २३ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा तडाखा दिला.


परभणीतील पाथरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर

Parbhani Storm |

हादगाव, कासापुरी मंडळाला तडाखा; केळी पिकांसह सोलर पॅनलचे मोठे नुकसान

परभणी (Parbhani Storm) : पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळात शनिवारी (दि. २३ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा तडाखा दिला. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे, शेतपिकांचे तसेच कृषी सोलर पॅनल युनिटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि हादगाव व कासापुरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी पाथरी शहरातही जोरदार वारे वाहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, हादगाव व कासापुरी महसूल मंडळ परिसरातील उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकाला या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हादगाव, वरखेड, डोंगरगाव, किन्होळा व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील सोलर पॅनल युनिटचेही मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. गाव तसेच शेत परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली असून जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या कडव्याच्या गंजीही वाऱ्यामुळे उडून गेल्या आहेत.

काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या असून अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: