Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीतील पाथरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर

पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळात शनिवारी (दि. २३ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा तडाखा दिला.


परभणीतील पाथरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर

Parbhani Storm |

हादगाव, कासापुरी मंडळाला तडाखा; केळी पिकांसह सोलर पॅनलचे मोठे नुकसान

परभणी (Parbhani Storm) : पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळात शनिवारी (दि. २३ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा तडाखा दिला. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे, शेतपिकांचे तसेच कृषी सोलर पॅनल युनिटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि हादगाव व कासापुरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी पाथरी शहरातही जोरदार वारे वाहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, हादगाव व कासापुरी महसूल मंडळ परिसरातील उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकाला या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हादगाव, वरखेड, डोंगरगाव, किन्होळा व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील सोलर पॅनल युनिटचेही मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. गाव तसेच शेत परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली असून जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या कडव्याच्या गंजीही वाऱ्यामुळे उडून गेल्या आहेत.

काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या असून अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: