Nanand dam fire: नणंदमध्ये बंधारा पेटविल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आग्रहानुसार शिवसेनेने तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
निलंगा (Nanand dam fire) : अज्ञाताने बंधाऱ्याला पेटवून दिल्याने की आज बंधाऱ्यावरून थेट अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पसरत जाऊन शेतकऱ्याचे आगीत मोठे नुकसान झाले. निलंगा तालुक्यातील नणंद येथे सोमवारी ही दुर्घटना घडली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
निलंगा तालुक्यातील नणंद येथे सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतीच्या बांधास आग लावली. ही (Nanand dam fire) आग जवळपास 50 एकरावर पसरत गेली. या आगीत शेतकरी बालाजी नामदेव गंभीरे यांच्या शेतातील गवत, रानावरील स्प्रिंकलर, स्प्रिंकलरचे पाईप, मोटार, वायर केबल, गुळी, कडबा इत्यादी शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. बालाजी नामदेव गंभीरे यांचे स्टार्टर, वायर, पाईप, बेंड याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
निळू नागनाथ लादे यांचा स्प्रिंकलर संच जळून खाक झाला. तसेच करीमखा पठाण यांची जनावरांना ठेवलेले गुळी, कडबा जळून खाक झाला. प्रशासनाने तात्काळ येऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.