Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, 1 मे पासून देखभाल ठप्प

महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात आणि थकित बिलांच्या प्रश्नावरून हिंगोली जिल्हा इलेक्ट्रिकल कंत्राटदार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.


हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन 1 मे पासून देखभाल ठप्प

MSEDCL Issue |

हिंगोली (MSEDCL Issue): महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात आणि थकित बिलांच्या प्रश्नावरून हिंगोली जिल्हा इलेक्ट्रिकल कंत्राटदार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1 मे पासून जिल्ह्यातील वीज देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला असून प्रत्यक्षात कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. 

असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार महावितरणकडून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले दीर्घ काळापासून थकवण्यात आली आहेत. वारंवार मागणी करूनही बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिवाय अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बिले तात्काळ द्या आणि अन्यायकारक कारभार थांबवा अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

या आंदोलनामुळे 1 मे पासून उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक व ब्रेकडाऊन कामे पूर्णपणे बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात वाढलेला वीज वापर आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर देखभाल कामे बंद राहिल्यास नागरिकांना वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. 

हा लढा जनतेच्या सुरक्षेसाठीच असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. थकित बिले न मिळाल्याने दुरुस्ती साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे दर्जेदार काम करणे शक्य होत नाही. वीज व्यवस्था सुरळीत हवी असेल तर महावितरणने तातडीने थकित बिले अदा करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कंत्राटदारांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले असून हक्कासाठी लढा हीच बांधिलकी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान महावितरणने यावर तातडीने तोडगा काढावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अन्यथा जिल्ह्यात वीज संकट गडद होण्याची भीती आहे.

Related to this topic: