Armori Taluka problem: आरमोरीच्या गावात पाण्याच्या संकट आणि शेतकऱ्यांना वनपट्टेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय अडचणी असली. कर्जबाजार, धान खरेदी व रोजगारीच्या कमतरत्या
स्थानिक समस्याकडे दुर्लक्ष: जनतेच्या विकासाचे काय?
भाजयुमो तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांचे स्थानिक लोकप्रतिनिधींना सवाल!
पायाभूत सुविधांचा अभाव
आरमोरी (Armori Taluka problem) : आरमोरी, देसाईगंज, धानोरा व कोरची परिसरातील अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. दुरुस्तीविना रस्ते खड्डेमय झाले आहेत काही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याने जोडले गेलेच नाही. मंजूर झालेल्या कामाचे आमदार व खासदार यांनी निधी आणण्यास असमर्थ असल्याकारणाने तालुक्याविकासात अजून दहा वर्षे मागे..
शेतीचे प्रश्न: कोटगुल परिसरातील वनपट्टेधारक शेतकरी हेक्टरी बोनस व प्रोत्साहन राशीपासून वंचितआहेत. वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे शासकीय धान खरेदी केंद्रातील सचिवाने आंतरजालावर नोंदणी न केल्यामुळे वनपट्टेधारक शेतकरी धान विकू शकले नाहीत. त्यामुळे आज ते कर्जबाजारी आहेत, तसेच अतिक्रमणधारक शेतकरी ज्यांना अजून पर्यंत वनपट्टे मिळालेले नाही असे शेतकरी एरणीवर आहेत या प्रश्नाकडे दुर्लक्ष!
शासकीय धान खरेदी केंद्र समोर पीकअपने विक्रीसाठी रब्बीचे धान आणून सुद्धा एकही कर्मचारी उपस्थित नाही. शेतकऱ्यांना तासोनातास वाट पाहावी लागत आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक यावर लोकप्रतिनिधींनी संसदेत किंवा विधिमंडळात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.
रोजगार आणि आरोग्य: तरुणांच्या हाताला काम नाही आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डॉक्टरांची कमतरता कायम आहे. केवळ राजकीय दौरे आणि जनसंपर्क :स्थानिक विकास कामांना निधी मिळवून देण्याऐवजी आमदार महोदय पक्षाच्या राजकीय सभा, पदयात्रा आणि उद्घाटन समारंभांमध्येच अधिक व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मतदारांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. भाजयुमो कोरची चे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी आरोप केले आहे.