Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा - कारंजा रोडवर कारचा अपघात; देव तारी त्याला कोण मारी म्हणीचा प्रत्यय

मानोरा–कारंजा मार्गावरील कुपटा घाटात २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास एक अपघात घडला.


मानोरा - कारंजा रोडवर कारचा अपघात देव तारी त्याला कोण मारी म्हणीचा प्रत्यय

Manora Accident |

मानोरा (Manora Accident) : मानोरा–कारंजा मार्गावरील कुपटा घाटात २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास एक अपघात घडला. वळणदार रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने कार थेट खाईत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी रेतीने भरलेला ट्रक पलटी झाल्याने रस्त्यालगतचे संरक्षक कटडे तुटले होते. मात्र संबंधित विभागाने अद्याप दुरुस्ती न केल्यामुळे हा धोका कायम होता. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी कारचालकाचे वाहन थेट दरीत गेले.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला असून, तुटलेल्या कटड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: