Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

मानव-वन्यजीव संघर्ष

मानव-वन्यजीव संघर्षातील माकडे पकडण्यासाठी आता 600 रुपये दर निश्चित

Human-Wildlife Conflict: राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील माकडे व वानरे पकडण्यासाठी नवीन दर 600 रुपये निश्चित केले गेले आहेत. यामुळे बचाव कार्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.


मानव-वन्यजीव संघर्षातील माकडे पकडण्यासाठी आता 600 रुपये दर निश्चित

Human-Wildlife Conflict |

जवळा बाजार (Human-Wildlife Conflict) : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील माकडे (Rhesus Macaque) व वानरे (Semnopithecus entellus) यांना सुरक्षित पकडून अधिवासात सोडण्यासाठी शासनाने नवीन दर निश्चित केले आहेत. महसूल व वन विभागाने 22 एप्रिल 2026 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, संघर्षग्रस्त माकड/वानर पकडून सुरक्षितपणे अधिवासात सोडल्यास प्रति माकड 600 रुपये दर अदा करण्यात येणार आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयाने यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधींकडून आर्थिक मापदंडात सुधारणा करण्याची मागणी वारंवार होत होती.

9 डिसेंबर 2025 रोजी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही दरवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर शासनाने या मागणीचा विचार करून दरात सुधारणा केली आहे. नवीन दर शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच 22 एप्रिल 2026 पासून लागू झाले आहेत.

शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की, पूर्वीच्या 25 नोव्हेंबर 2025 च्या निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम राहतील. केवळ माकडे पकडून सोडण्याच्या दरात बदल करण्यात आला आहे. हा (Human-Wildlife Conflict) आदेश विशेष कार्य अधिकारी उदय चंद्रकांत ढगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या मानव-वानर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या या निर्णयामुळे बचाव कार्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Related to this topic: