Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

महावितरण कारभार

महावितरणचा गलथान कारभार; तालूक्यातील अनेक गावे रात्रभर अंधारात,नागरीक त्रस्त

Mahavitaran Centres: परभणीच्या सेलू तालूक्यात झालेल्या वादळी वा-यामूळे शेतीसह घरांच्या पत्र्यांचे नूकसान झाले तर महावितरणच्या उपकेंद्रांतून विद्यूत पूरवठ्या अभावी


महावितरणचा गलथान कारभार तालूक्यातील अनेक गावे रात्रभर अंधारातनागरीक त्रस्त

Mahavitaran Centres |

 

जबाबदार अभियंते व कर्मचारी नाँटरिचेबल

परभणी/ सेलू (Mahavitaran Centres) : परभणीच्या सेलू तालूक्यात झालेल्या वादळी वा-यामूळे शेतीसह घरांच्या पत्र्यांचे नूकसान झाले तर महावितरणच्या उपकेंद्रांतून विद्यूत पूरवठ्या अभावी तालू्क्यातील बहूतांश गावात नागरीकांना रात्र अंधार काढावी लागली.बूधवार १३ मे रोजी तालूक्यात दूपारी ३ च्या वेळी वादळी वारे तर काही ठिकाणी आवकाळी पावसामूळे विद्यूत तारांवर झाडे पडल्यामूळे तांत्रीक बिघाड झाली होती.

दरम्यान महावितरणच्या वतिने विद्यूत पूरवठा सूरळीत करण्यासाठी कूठलीही प्रभावी यंत्रना राबविली गेली नसल्यामूळे काही उपकेंद्रातील विद्यूत पूरवठा सूरळीत करण्यात आला नाही त्यामूळे नागरीकांना रात्र अंधार काढावी लागली.तर महावितरणचे अभियंते व कर्मचारी मोबाईल बंद करून बसले होते.नागरीक संबधित उपकेंद्राच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करत असतांना त्यांचा भ्रमणध्वनी नाँटरिचेबल होता.दरम्यान सदरिल अधिकारी, कर्मचारी हे जबाबदारी झटकून काम करत असल्याने नागरीकात तिव्र नाराजी पसरली आहे.

पाऊस थेंबभर लाईट नाही रात्रभर

तालूक्यात मागील अनेक दिवसापासून (Mahavitaran Centres) विद्यूत पूरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.अनेक वेळा विद्यूत पूरवठा खंडीत होतो.तालूक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान या सर्व बाबीकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दूर्लक्ष करत असल्याचा प्रकार सूरू आहे.शहरातील फ्यूज काँल सेंटरचा संपर्क नंबर असो का तालूक्यातील उपकेंद्राचा संपर्क नंबर तसेच संबधित उपविभागीय कार्यकारी अभियंता यांच्यासह उपकेंद्राचे अभियंते व लाईन स्टाफ यांचे देखील संपर्क नंबर अनेकवेळा नाँटरिजेबल असतात.

तर मागील अनेक वर्षापासून दूरूस्तीची कामे केवळ थातूरमातूर केली जात असल्याने वेळोवेळी फाँल्ट होतात.तसेच विद्यूत तारा तूटून विद्यूत पूरवठा खंडीत होतो.मात्र ही दूरूस्तीची कामे करणा-या कंत्राट कंपन्यावर योग्य कारवाही होणे गरजेचे आहे.तालूक्यात मागील अनेक दिवसापासून थोडा पाऊस पडला किंवा वारे आले तर रात्रभर विद्यूत पूरवठा खंडीत होत असल्याने पाऊस थेंबभर लाईट जाते रात्रभर अशी परिस्थीती तालूक्यात आहे.