Parbhani Reservation Marcha: परभणीत मातंग समाज बांधवांनी जिल्हा प्रशासनावर आरक्षणासाठी मोर्चा करून आरक्षण उपवर्गीकरणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आग्रह व्यक्त केले.
अनु.जाती उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी करा...!
हजारो समाज बांधवांचा मोर्चात सहभाग
परभणी (Parbhani Reservation Marcha) : आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवार १५ जून रोजी मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण आसूड मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनुसूचित जाती आरक्षण (Parbhani Reservation Marcha) उपवर्गीकरण प्रारुप आरखडा ठरविण्यासाठी नेमलेल्या न्या. बदर समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. काही ठराविक जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र काही जाती या सर्व प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जात होत्या. त्यांना संधी निर्माण करुन देण्यासाठी सरकारने विशेष तरतुद केली, अशी शिफारस १९६५ सालीच बी.एन. लोकुर समितीने केली होती. त्यानंतर न्या. बदर समितीने अहवाल सादर करुन उपवर्गीकरणाची शिफारस केली.
त्यामुळे शासनाने न्या. बदर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करुन उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन राज्यात अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आरक्षण आसूड मोर्चा (Parbhani Reservation Marcha) सोमवारी विविध मातंग संघटनांच्यावतीने जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. या मोर्चात कॉ. गणपत भीसे, के.के. भारसाकळे, रोहिदास नेटके, कुणाल गायकवाड, पप्पूराज शेळके, अरुण सोनवणे, दादाराव काळे, कोंडिबा जाधव, एल.डी. कदम, रेखा कांबळे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.