Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शेतकऱ्याचे नुकसान

महाराष्ट्रात विद्युत तारेमुळे शेतात आग, शेतकरीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील सेनगाव येथे शेतकरी रामजी ग्यानबा इंगळे यांच्या शेतात विद्युत तारेमुळे आग लागून त्यांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले.


महाराष्ट्रात विद्युत तारेमुळे शेतात आग शेतकरीचे मोठे नुकसान


सेनगाव : सेनगाव तालुक्यातील सिनगी नागा येथील शेतकरी रामजी ग्यानबा इंगळे यांच्या शेतात सोमवारी (दि. १६) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या विद्युत तारेमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत इंगळे यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इंगळे यांच्या शिवारातील गट क्रमांक १९८ मध्ये अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. उभे असलेले गव्हाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच शेतातील पाइपलाइनसह विविध शेती साहित्यही आगीत भस्मसात झाले.

या दुर्दैवी घटनेत इंगळे यांचा एक बैल गंभीररित्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर आणखी संकट कोसळले आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या धाडसामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

एकीकडे निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त असलेला शेतकरी, तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेला असताना अशा आगीच्या घटनांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

Related to this topic: