Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर काँग्रेस

लातूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Latur Congress: काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची नव्याने निवड झाली असून  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी


लातूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Latur Congress |

लातूर (Latur Congress) : काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची नव्याने निवड झाली असून  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. अभय साळुंके यांची फेरनिवड झाली आहे. आज लातूर काँग्रेस भवन मध्ये मावळते लातूर शहर जिल्हाध्यक्ष ऍड.  किरण जाधव यांच्याकडून प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी पदभार स्वीकारला. असंख्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पदग्रहण समारंभास राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख यांनी खा. डॉ. शिवाजी काळगे व मान्यवरांसह उपस्थित राहून नूतन शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख (MLA Amit Deshmukh) म्हणाले की, काँग्रेस पक्षाने (Latur Congress) संघटन सृजन अभियान राबवून,  पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत, सर्व समाज घटकांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल याचा या अभियानात प्राधान्याने विचार केला आहे. पक्ष संघटनेसाठी अधिकाधिक वेळ देतील अशा पदाधिकाऱ्यांचीच या अभियानामार्फत निवड करण्यात आली आहे.

सध्या देशात आणि राज्यात सर्व यंत्रणा भ्रष्टाचारणे पोखरून निघाल्या आहेत, त्यात सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळत नाही, महागाईने कळस गाठला आहे, परिणामी सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे, यातून जनतेमध्ये सरकार बद्दल असंतोष निर्माण झालेला आहे. या परिस्थितीत जनता योग्य पर्याय याच्या शोधात आहे, काँग्रेस पक्षाचा विचार आणि ध्येयधोरणे सामान्य माणसाला न्याय  देणारी आहेत, पक्षाचा हा विचार प्रत्येक घरापर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर आहे. 

येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे (Latur Congress) सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी संघटन बांधणीला अधिक महत्त्व द्यावे, सध्या निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन एकही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची काळजी घ्यावी, जनगणनेच्या प्रक्रियेतही सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेला मदत करावी, बूथ यंत्रणा अधिक सक्षम करावी असे आवाहन यावेळी आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले.

Related to this topic: