Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जल जीवन मिशनला घोटमध्ये ब्रेक; २२ कोटींची नळयोजना ठप्प, ७ महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जल जीवन मिशनला घोटमध्ये ब्रेक २२ कोटींची नळयोजना ठप्प ७ महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद

Jal Jeevan Mission |

त्या 22 कोटीच्या पांढऱ्या हत्तीचे करायचे काय... ?

घोट (Jal Jeevan Mission) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत घोट गट ग्रामपंचायतीतील चार गावांसाठी उभारण्यात आलेली सुमारे २२ कोटी रुपयांची नळयोजना पूर्णपणे ठप्प झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या दोन महिन्यांतच बंद पडलेली ही योजना गेल्या सात महिन्यांपासून कार्यरत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून ‘हर घर जल’ हे ध्येय ठेवून जल जीवन मिशन राबविण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र घोट परिसरात ही योजना प्रत्यक्षात अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, योजनेच्या सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. योजना सुरू झाल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच पाणीपुरवठा खंडित झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

नळयोजना बंद पडल्यामुळे महिलांना व नागरिकांना दररोज दूरवरून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच गंभीर बनली असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. एवढ्या मोठ्या निधीतून उभारलेली योजना अल्पावधीतच निष्क्रिय ठरणे, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.

जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देणे, दररोज प्रति व्यक्ती किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे आणि सातत्यपूर्ण सेवा देणे हे महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र घोट परिसरात गेल्या सात महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने या सर्व निकषांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

दरम्यान, “२२ कोटींच्या या पांढऱ्या हत्तीचे आता करायचे तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नळयोजना तात्काळ सुरू करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी घोट परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

Related to this topic: