Hyderabad-Jaipur Railway: हैद्राबाद-जयपूर आणि काचिगुडा-श्रीगंगानगर रेल्वे नियमित धावणार असून प्रवाशांसाठी वाढलेल्या प्रवास भाड्यात कपात होणार आहे.
वाढलेल्या प्रवास भाड्यात कपात होणार
हिंगोली (Hyderabad-Jaipur Railway) : उन्हाळी सुट्टया, धार्मिक व पर्यटन स्थळांना येणार्या जाणार्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनातर्फे पुर्णा - वसमत - हिंगोली - वाशिम, अकोला मार्गावरून धावणार्या जयपूर व श्री गंगासागर एक्सप्रेस रेल्वेला नियमितपणे दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना विशेष रेल्वेसाठी वाढवलेल्या प्रवास भाड्यातून मुक्ती मिळून आर्थिक दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी वसमत, हिंगोली मार्गाने धावणार्या १७४२९/१७४३० तिरूपती - अकोला - तिरूपती रेल्वे क्रमांक १७२९५ / १७२९६ काकीनाडा - हिसार - काकीनाडा या साप्ताहीक रेल्वेला नियमित रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. याच अनुषंगाने दक्षिण मध्यरेल्वेतर्फे स्पेशल रेल्वे क्रमांक ०७०१९/०७०२० हैद्राबाद - जयपूर - हैद्राबाद नवीन नियमित रेल्वे क्रमांक १७०७९ / १७०८० व्दारे धावतील. तसेच रेल्वे क्रमांक ०७०५३/ ०७०५४ काचिगुडा - श्रीगंगा नगर - काचिगुडा व्हाया जयपूर बिकानेर साप्ताहीक (Hyderabad-Jaipur Railway) रेल्वे नवीन नियमित रेल्वे क्रमांक १७६०१/ १७६०२ व्दारे धावणार असल्याची माहिती स्टेशन मास्तर पप्पु कुमार यांनी दिली आहे.
नागपूर - हिंगोली - कोल्हापूर व अमरावती - हिंगोली - पुणे रेल्वेला दररोज सोडून अकोला - पुर्णा मार्गाने नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणी समर स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू, प्रविण पडघन, डॉ. विजय निलावार आदींनी एका निवेदनाव्दारे केली आहे.