Hingoli water crisis: हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात पाणी पुरवठा अपुर्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेकडून उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
हिंगोली (Hingoli water crisis) : शहराच्या शेवटचे टोक असलेल्या गवळीपुरा भागात नगर पालिका पाणी पुरवठा विभागातर्फे अपुरा पाणी पुरवठा सोडला जात आहे. २३ एप्रिल रोजी बर्याच दिवसानंतर पाणी पुरवठा सोडला असता काही नळांना पाणी आलेच नाही तर काही नळांना कमी दाबाचा पाणी पुरवठा झाल्याने पाणी भरण्यासाठी घरातील सर्व सदस्यांना तारेवरची कसरत करावी लागली. हिंगोली शहरामध्ये सध्या पाणी पुरवठ्या संदर्भात मोठी ओरड सुरू आहे. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांना टँकरव्दारे पाणी उपलब्ध करून घ्यावे लागत आहे.
हिंगोली शहरातील गवळीपुरा हा भाग जुना असुन शहराच्या शेवटच्या टोकाला आहे. या भागामध्ये (Hingoli water crisis) अपुरा पाणी पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे गवळीपुरा भागापासून काही अंतरावरच मंगळवारा बाजारात नगर पालिकेचे जलकुंभ उभारण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत चांगल्या दाबाचा पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना गवळीपुरा भागातील नागरीकांचा पाण्यासाठी वनवास सुरू आहे. गवळीपुरा हा भाग नेहमीच संवेदनशील म्हणुन ओळखला जातो, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मागील काही वर्षापूर्वी या भागातून मोठे आंदोलनही उभारण्यात आले होते. आज परिस्थितीमध्ये या भागातील अपुरा पाणी पुरवठा हा नागरीकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
२३ एप्रिल रोजी आठ दिवसानंतर गवळीपुरा भागात नगर पालिकेच्या (Hingoli water crisis) पाणी पुरवठा विभागाने पाणी सोडले परंतु काही नळांना पाणी आले नाही तर काही नळांना कमी दाबाचा पाणी पुरवठा झाला. नागरीकांनी पालिका प्रशासनाकडे संपर्क साधूनही नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नाकरीता भविष्यात एखादे आंदोलन उभे टाकू शकते असे नागरीकातून बोलले जात आहे.