Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पाणी संकट

हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात नागरीकांना पाण्यासाठी वनवास; जलकुंभ उशाला कोरड घशाला

Hingoli water crisis: हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात पाणी पुरवठा अपुर्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेकडून उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.


हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात नागरीकांना पाण्यासाठी वनवास जलकुंभ उशाला कोरड घशाला

Hingoli water crisis |

हिंगोली (Hingoli water crisis) : शहराच्या शेवटचे टोक असलेल्या गवळीपुरा भागात नगर पालिका पाणी पुरवठा विभागातर्फे अपुरा पाणी पुरवठा  सोडला जात आहे. २३ एप्रिल रोजी बर्‍याच दिवसानंतर पाणी पुरवठा सोडला असता काही नळांना पाणी आलेच नाही तर काही नळांना कमी दाबाचा पाणी पुरवठा झाल्याने पाणी भरण्यासाठी घरातील सर्व सदस्यांना तारेवरची कसरत करावी लागली. हिंगोली शहरामध्ये सध्या पाणी पुरवठ्या संदर्भात मोठी ओरड सुरू आहे. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांना टँकरव्दारे पाणी उपलब्ध करून घ्यावे लागत आहे. 

हिंगोली शहरातील गवळीपुरा हा भाग जुना असुन शहराच्या शेवटच्या टोकाला आहे. या भागामध्ये (Hingoli water crisis) अपुरा पाणी पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे गवळीपुरा भागापासून काही अंतरावरच मंगळवारा बाजारात नगर पालिकेचे जलकुंभ उभारण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत चांगल्या दाबाचा पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना गवळीपुरा भागातील नागरीकांचा पाण्यासाठी वनवास सुरू आहे. गवळीपुरा हा भाग नेहमीच संवेदनशील म्हणुन ओळखला जातो, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मागील काही वर्षापूर्वी या भागातून मोठे आंदोलनही उभारण्यात आले होते. आज परिस्थितीमध्ये या भागातील अपुरा पाणी पुरवठा हा नागरीकांसाठी त्रासदायक ठरत आहे. 

२३ एप्रिल रोजी आठ दिवसानंतर गवळीपुरा भागात नगर पालिकेच्या (Hingoli water crisis) पाणी पुरवठा विभागाने पाणी सोडले परंतु काही नळांना पाणी आले नाही तर काही नळांना कमी दाबाचा पाणी पुरवठा झाला. नागरीकांनी पालिका प्रशासनाकडे संपर्क साधूनही नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नाकरीता भविष्यात एखादे आंदोलन उभे टाकू शकते असे नागरीकातून बोलले जात आहे.

Related to this topic: