Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पाणीपुरवठा

हिंगोलीत पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब; निर्जळीनंतर बाराव्या दिवशी पाणीपुरवठा

Hingoli Water Supply: हिंगोलीत १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाला, नागरिकांना त्रास झाला आणि पाण्याच्या अभावामुळे आरोग्य समस्या उद्भवल्या.


हिंगोलीत पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब निर्जळीनंतर बाराव्या दिवशी पाणीपुरवठा

Hingoli Water Supply |

हिंगोली (Hingoli Water Supply) : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विवेकानंद नगर, हिल टॉप कॉलनी, गोविंद नगर संन्मती कॉलनी यासह अन्य भागातील नागरिकांना तब्बल बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पाणीपुरवठा करण्यात आला. या काळात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या जल कुंभावरून अनेक नवीन व जुन्या वसाहतीमध्ये पाणीपुरवठा रोटेशन नुसार केला जातो.गोविंद नगर विवेकानंद नगर सन्मती कॉलनी हिल टॉप कॉलनी व इतर भागात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल ला पाणीपुरवठा सोडण्यात आला होता. त्यानंतर डिग्रस कर्‍हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात ट्रांसफार्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल १२ दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हातपंप, विहिरी कोरड्या पडल्याने अनेकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. खासगी टँकरचालकांनी मनमानी दर आकारल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले. एक टँकर ८०० ते १२०० रुपयांना विकला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

या (Hingoli Water Supply) भागातील महिलांना सकाळपासून पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागली. लहान मुलांना शाळेत पाठवणे, दैनंदिन कामे करणे यावरही परिणाम झाला. काही नागरिकांनी तर शेजारच्या भागातून पाणी आणून दिवस ढकलले. पाणीटंचाईमुळे परिसरात आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.

नगर परिषदेकडे काही नागरिकांनी चौकशी केली असता डिग्रस कर्‍हाळे येथील जनित्रा मधील तांत्रिक बिघाडीमुळे  पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. दुरुस्तीचे काम वेळेत न झाल्याने नागरिकांना १२ दिवस पाण्याविना काढावे लागले. शनिवारी सकाळी कमी दाबाने का होईना, पण पाणीपुरवठा सुरू झाला तेव्हा नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र पुरेसे पाणी न मिळाल्याने अनेकांच्या घरातील टाक्या अर्ध्याच भरल्या.

स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती असते. पाणीपुरवठ्याचे नियोजन आधी का केले जात नाही?" असा सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे. 

दरम्यान, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा (Hingoli Water Supply) विभागाचे अभियंता म्हणाले की, "तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाला. आता यंत्रणा पूर्ववत झाली असून यापुढे नियमित पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील." मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या आश्वासनांवर अविश्वास दाखवला आहे. शहरातील इतर भागांतही अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Related to this topic: