Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जल जीवन मिशन योजना

पाणी टंचाईग्रस्त गावाचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Jal Jeevan Mission: हिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशन व घरकुल योजनेवर विशेष बैठक आयोजित केली गेली, ज्यात सीईओ विवेक गायकवाड यांनी पाणीपुरवठा व महिलांच्या रोजगारावरील प्रभावाच्या मुद्द्यांवर भर दिला.


पाणी टंचाईग्रस्त गावाचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा 

Jal Jeevan Mission |

 

जल जीवन व घरकुल योजनेचा आढावा

​हिंगोली (Jal Jeevan Mission) : जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता जल जीवन मिशन योजना बाबत तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीचा आढावा घेण्यात आला जल जीवन मिशन योजनाची कामे पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी द्या असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. (Jal Jeevan Mission) हिंगोली पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित 'जल जीवन मिशन' घरकुल व एकल महिला आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, गट विकास अधिकारी माया वानखडे, सहाय्यक गट विकास अधिकारी विष्णू भोंजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गणेश जोगदंड यांची उपस्थिती होती. गावातून तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी. गावातील लोकांच्या तक्रारी गावातच सोडविण्यात याव्यात चांगल्या कामाला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सर्वांचा सहभाग घेऊन एकत्रपणे काम केले पाहिजे असा संदेश या बैठकीमध्ये त्यांनी दिला आणि गावकऱ्यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा कसा होईल यावर भर द्यावा.

महिलांची पायपीट थांबवा; रोजगारावर होतोय परिणाम

​पाणी टंचाईचा सामाजिक परिणाम अधोरेखित करताना गायकवाड यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "अनेक गावांत महिलांना पाण्यासाठी ३-४ तास खर्च करावे लागत आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. जनतेला शुद्ध आणि वेळेवर पाणी मिळणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांची परवड थांबवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे." 

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश:
​मिशन मोडवर काम: सर्व 'ड्राय सोर्स' (कोरडे पडलेले स्त्रोत) हे "जल तारा" उपक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करावेत. हे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
​ ग्राम पंचायत अधिकारी यांनी गाव नकाशा तयार करून गावातील सर्व पाणी स्त्रोत रेखांकन करून 15 दिवसात गाव नकाशे तयार करण्याचे  आदेश दिले व संभाव्य पाणी टंचाई च्या अनुषंगाने करावयाच्या आवश्यक तरतुदीची  माहिती अद्यावत करण्याचे निर्देश दिले.

​याचबरोबर घरकुल योजनेचा (Jal Jeevan Mission) सविस्तर आढावा घेण्यात आला. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे गायरन व इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी विहित मुदतीत घरकुल पूर्ण करून त्याचा लाभ वेळेत दिला पाहिजे असे निर्देश सीईओ विवेक गायकवाड यांनी दिले. ​बालसंगोपन अंतर्गत 2250 रुपये प्रति महा मुलींना शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून देण्यात येते त्यामुळे हे काम वेळेत करावे.  एकल महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात यावे आशा सूचना देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: