Breaking News
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!
  • मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
  • बीड नगरपालिकेत राडा! मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी, घटना CCTV मध्ये कैद
  • दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली!
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • सिंधुदुर्ग मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; १५ वाहनं जप्त
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत
  • रत्नागिरी RTO ने 2025–26 मध्ये ₹128.54 कोटींचा विक्रमी महसूल जमा; शासनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खा. रामराव वडकुते यांच्याकडून भूकंपग्रस्त पांगरा शिंदेची पाहणी, भूकंपरोधक विकासाचे आश्वासन

हिंगोली जिल्ह्यात 11 जून 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.


खा रामराव वडकुते यांच्याकडून भूकंपग्रस्त पांगरा शिंदेची पाहणी भूकंपरोधक विकासाचे आश्वासन

Hingoli Earthquake |

हिंगोली (Hingoli Earthquake) : हिंगोली जिल्ह्यात 11 जून 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव असल्याचे बोलले जात आहे. या भूकंपामुळे गावातील कच्च्या मातीची काही घरे कोसळली, तर अनेक पक्क्या घरांना मोठे तडे गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते यांनी  पांगरा शिंदे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. “येणाऱ्या काळात पांगरा शिंदे गावात भूकंपरोधक विकास कामे केली जातील. नागरिकांनी घाबरू नये, प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासन खा. वडकुते यांनी यावेळी दिले.

या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई तांभाळे, तालुकाध्यक्ष डॉ. अवधुतराव शिंदे, संजय काकडे यांच्यासह समस्त गावकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी खासदार रामराव वडकुते यांच्याकडे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी केली. 

भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात असून, लवकरच मदतकार्य सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावात सध्या भीतीचे वातावरण असून नागरिक उघड्यावर जीव मुठीत धरून राहत आहेत.

Related to this topic: