Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

घोटला न्याय कधी..? ४० वर्षांपासून प्रतीक्षेत घोट तालुका; अन्यायाविरोधात संतापाची लाट

जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या घोट परिसराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे.


घोटला न्याय कधी ४० वर्षांपासून प्रतीक्षेत घोट तालुका अन्यायाविरोधात संतापाची लाट

Ghot Taluka Demand |

घोट (Ghot Taluka Demand) : जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या घोट परिसराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. 1989 व 1991 मध्ये या मागणीसाठी भव्य मोर्चे काढण्यात आले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात घोटचा विचार न करता इतर ठिकाणी नवीन तालुका जाहीर करण्यात आल्याने घोट परिसरावर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आजही कायम आहे.

त्यानंतरच्या काळातही घोट तालुक्यासाठी सातत्याने चाळीस वर्षात  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी ते देवेंद्र फडणवीस सर्वांना भेटी घेऊन व  मोर्चे, आंदोलने,बाजारपेठ बंद, निवेदन सादरीकरण असे विविध मार्गांनी लढा उभारण्यात आला.परंतु चार दशकांनंतरही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट पसरली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत प्रशासनाने न्याय न दिल्यास मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घोट परिसरातील आदिवासी व दुर्गम भागाचा विचार करून स्वतंत्र तालुका घोषित करावा,अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

घोट तालुक्यासाठी 19 ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून  घोट, पेटतळा, सिमुलतला,भाडभिडी बी, हळदवाही, मक्केपल्ली चेक, मक्केपल्ली माल, माडेआमगाव,रेगडी, विकासल्ली,चापलवाडा, वरूर,नेताजीनगर,वसंतपुर, बहादुरपुर,सुभाषग्राम, येडानुर,राममोहनपुर, पावीमुरांडा आदी ग्रामपंचायतीच्या पाठिंबा दर्शविला असून, या ग्रामपंचायत मध्ये अनेक गावे आदिवासी व पेसा क्षेत्रातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घोट तालुक्यासाठी ठराव पारित केले असून  प्रशासन महाराष्ट्र शासनानेया ठरावांची दखल घेऊन तातडीने घोट तालुक्याच्या निर्णय घेऊन   घोट तालुकाच्या मार्ग सुकर करावा अशी अपेक्षा जनसामान्य नागरिकात केली जात आहे.

Related to this topic: