Gadchiroli E-bus Fire: गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ई-बसला आग लागून प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. सर्व ४० प्रवासी सुरक्षितपणे बसमधून बाहेर पडले, जीवितहानी टळली.
४० प्रवासी सुखरूप
गडचिरोली (Gadchiroli E-bus Fire) : गडचिरोलीवरून Chandrapur येथे जाणाऱ्या चंद्रपूर आगाराच्या ई-बसला शनिवारी (दि. ९ मे) दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व ४० प्रवासी वेळेत खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र प्रवाशांचे सामान आणि बॅगा आगीत जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीवरून दुपारी साडेतीन वाजता निघालेली इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी (Gadchiroli E-bus Fire) ई-बस चंद्रपूरकडे जात होती. दरम्यान, लोहार्या परिसरात सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास बसमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला.
आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, काही वेळातच संपूर्ण बस ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रसंगावधान राखत चालक व प्रवाशांनी तत्काळ बस खाली केल्याने सर्वांचे प्राण वाचले. मात्र प्रवाशांच्या बॅगा, कागदपत्रे आणि इतर साहित्य आगीत जळून खाक झाले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग एवढी भीषण (Gadchiroli E-bus Fire) होती की बसचा क्रमांकही ओळखता येत नव्हता. घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बस आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात आले.