Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

देऊळगावराजा शहरातील मध्यवर्ती भागात भीषण आग; मेन रोडवरील पाच दुकाने जळून खाक


देऊळगावराजा शहरातील मध्यवर्ती भागात भीषण आग मेन रोडवरील पाच दुकाने जळून खाक

Fire Accident |

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज – अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

देऊळगाव राजा (Fire Accident) : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती भागातील मेन रोडवरील सलग पाच दुकानांना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आग इतकी भीषण होती की काही क्षणातच आगीचे मोठमोठे लोळ उसळले आणि मुख्य मार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीत किराणा दुकान, रेडिमेड कपड्यांचे दुकान, आईस्क्रीम पार्लर तसेच इतर दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा नगर परिषद अग्निशमन विभागच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

Related to this topic: