Pandan Rasta Encroachment: पांधन रस्त्यावर शेतकर्यांचे शेत जाण्यास अडथळा असल्यामुळे उपोषणासाठी इशारा देऊन शेतकरी प्रबळ मागणी करीत आहेत. गेल्या तीन वर्षात कार्यवाही झाली नाहीत.
७७ शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या
अतिक्रमण न हटविल्यास १४ ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा
मानोरा (Pandan Rasta Encroachment) : तालुक्यातील उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील किराणा दुकानाचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींवर गेल्या ३ वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न झाल्याने गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याबाबत राजेश बाबुराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दि. १३ जुलै रोजी निवेदन देऊन तातडीने अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, गैरअर्जदार पंडित भावसिंग राठोड, रा. उमरी खुर्द यांनी पांदन रस्त्यावर किराणा दुकानाचे अतिक्रमण केले आहे. हे (Pandan Rasta Encroachment) अतिक्रमण हटवून पांदन रस्ता खुला करावा यासाठी राजेश राठोड यांनी आतापर्यंत सहा वेळा विविध स्तरावर प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु सबंधित कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पांदन रस्ता बंद असल्यामुळे ७८ शेतकरी खातेदारांच्या शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन गैरअर्जदाराचे पांदन रस्त्यावरील दुकानाचे अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता येईल, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने या (Pandan Rasta Encroachment) प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा १४ ऑगस्ट २०२६ पासून तहसील कचेरीसमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.. बाबुसिंग महाराज राठोड, आ. सईताई डहाके, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आदींना पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले असुन तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.