Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पांदन रस्ता अतिक्रमण

उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील अतिक्रमण न हटवल्याने शेतकऱ्यांचे हाल

Pandan Rasta Encroachment: पांधन रस्त्यावर शेतकर्यांचे शेत जाण्यास अडथळा असल्यामुळे उपोषणासाठी इशारा देऊन शेतकरी प्रबळ मागणी करीत आहेत. गेल्या तीन वर्षात कार्यवाही झाली नाहीत.


उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील अतिक्रमण न हटवल्याने शेतकऱ्यांचे हाल

Pandan Rasta Encroachment |

 

७७  शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या
अतिक्रमण न हटविल्यास १४ ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा

मानोरा (Pandan Rasta Encroachment) : तालुक्यातील उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील किराणा दुकानाचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची  मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींवर गेल्या ३ वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न झाल्याने गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याबाबत राजेश बाबुराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दि. १३ जुलै रोजी निवेदन देऊन तातडीने अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.  

निवेदनानुसार, गैरअर्जदार पंडित भावसिंग राठोड, रा. उमरी खुर्द यांनी पांदन रस्त्यावर किराणा दुकानाचे अतिक्रमण केले आहे. हे (Pandan Rasta Encroachment) अतिक्रमण हटवून पांदन रस्ता खुला करावा यासाठी राजेश राठोड यांनी आतापर्यंत सहा वेळा विविध स्तरावर प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु सबंधित कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पांदन रस्ता बंद असल्यामुळे ७८ शेतकरी खातेदारांच्या शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन गैरअर्जदाराचे पांदन रस्त्यावरील दुकानाचे अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता येईल, अशी मागणी केली आहे.

प्रशासनाने या (Pandan Rasta Encroachment) प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा १४ ऑगस्ट २०२६ पासून तहसील कचेरीसमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ..  बाबुसिंग महाराज राठोड, आ. सईताई डहाके, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आदींना पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले असुन तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Related to this topic: