Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे उसेगाव परिसरातील शेतकरी नेस्तनाबूत

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यांमध्ये रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम सुरू आहे.


रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे उसेगाव परिसरातील शेतकरी नेस्तनाबूत

Elephant Attack |

33 हत्तींचा कळप ठाण मांडून

गडचिरोली (Elephant Attack) : गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम या हत्तीच्या कळपाने सुरू केले आहे. उभे पीक नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्या हत्तीचा कळप उसेगाव परिसरात ठाण मांडून असून उसेगाव येथील विमलबाई तुमरेटी, अल्का जीवन कुमोटी यांच्या शेतातील आंबा, पईप, ताळ या झाडांचे तसेच धान, मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. फळझाडे जगवण्यासाठी शेतकऱ्यांना 20 ते 25 वर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र रानटी हत्तींचा कळप एका दिवसात होत्याचे नव्हते करून सोडत आहे.

प्रतीक्षा जनार्धन ठुनेकार यांच्या धान शेतीचे तसेच विमल तुमरेटी, अल्का जीवन कुमोटी यांच्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले. कृष्णाजी राऊत यांच्या शेतातील मिरची पीक या हत्तीच्या कळपाने पायदळी तुडवले.

झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव मधुकर रेवाडे यांनी केली आहे.

Related to this topic: