Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Electricity Outage,

पुसेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावर नागरिकांचा संताप; चार दिवसांपासून तीन फीडरचा रात्री वीजपुरवठा बंद असल्याचा आरोप

पुसेगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर शुक्रवारी (दि. १७ जुलै) रात्री खुडज, रिधोरा, जांभरून व पारडी परिसरातील नागरिकांनी धाव घेत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.


पुसेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावर नागरिकांचा संताप चार दिवसांपासून तीन फीडरचा रात्री वीजपुरवठा बंद असल्याचा आरोप

सेनगाव तालुका : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर शुक्रवारी (दि. १७ जुलै) रात्री खुडज, रिधोरा, जांभरून व पारडी परिसरातील नागरिकांनी धाव घेत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत या गावांना वीजपुरवठा करणारे तीन फीडर बंद ठेवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

याउलट, पुसेगाव गावठाणाचा वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवला जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरिकांनी उपकेंद्रावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारत वीजपुरवठ्यात भेदभाव का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. नियोजनबद्ध पद्धतीने सर्व गावांना समान वीजपुरवठा करावा आणि कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणांमुळे काही काळ वीजपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, ही समस्या तातडीने दूर करून नियमित वीजपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे महावितरणच्या वीजपुरवठा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related to this topic: