Breaking News
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!
  • मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
  • बीड नगरपालिकेत राडा! मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी, घटना CCTV मध्ये कैद
  • दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली!
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • सिंधुदुर्ग मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; १५ वाहनं जप्त
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत
  • रत्नागिरी RTO ने 2025–26 मध्ये ₹128.54 कोटींचा विक्रमी महसूल जमा; शासनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारत माध्यमिक शाळेत महामानवास अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar: रिसोडच्या भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी केली गेली, ज्यात शाळा स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


भारत माध्यमिक शाळेत महामानवास अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar |

रिसोड (Dr. Babasaheb Ambedkar) : येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न,प्रख्यात विद्वान,थोर समाज सुधारक, बोधिसत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल २०२६ मंगळवारला शाळेच्या सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाली.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे प्राचार्य संजय भांडेकर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी मध्ये शाळेचे उपप्राचार्य  संजय शर्मा, पर्यवेक्षक  ज्ञानेश्वर थोरात तसेच शाळेचे जेष्ठ  शिक्षक श्री घोडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री तुरुकमाने सर, श्री कटारे सर उप प्राचार्य श्री शर्मा सर, पर्यवेक्षक थोरात सर यांनी आपल्या भाषणामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवन चरित्राचा व भारतीय राज्यघटनेचा सविस्तर आढावा घेतला.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भांडेकर सर यांनी राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखांकित करून राज्यघटना यशस्वी करायची असेल तर शासन, प्रशासन व सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून केवळ अधिकार मागण्यापेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करणे ही आपल्या सर्वांची आद्य जबाबदारी आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षक,शिक्षिका, वर्ग नववीचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन डी. एन. देशमुख सर यांनी पार पाडले.

Related to this topic: