Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ

डायल ११२

डायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

Dial 112: डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेशा महादेव झाटे


डायल ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

Dial 112 |

चान्नी (Dial 112) : आपत्कालीन सेवा डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला त्रास देणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०९ मे २०२६ रोजी एका व्यक्तीने डायल ११२ वर कॉल करून आपल्या भाचीवर गावातील काही मुलांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. या गंभीर माहितीची दखल घेत पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व चौकशी सुरू केली.

घटनास्थळी भेट देऊन संबंधित व्यक्तींची विचारपूस व बयाण नोंदविण्यात आले. मात्र तपासाअंती सदर माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गणेशा महादेव झाटे (वय २५ वर्ष) याच्याविरुद्ध पोलीसांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याप्रकरणी बीएनएस अधिनियमाच्या कलम १७७ अन्वये चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाणेदार यांच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारे खोटी माहिती देऊन आपत्कालीन सेवांचा गैरवापर करू नये. अशा कृत्यांमुळे पोलीस यंत्रणेचा वेळ व संसाधने वाया जातात आणि खरी गरज असलेल्या नागरिकांना मदत मिळण्यात विलंब होऊ शकतो.

Related to this topic: