Daihantola Gram Panchayat: दैहानटोला गावात ग्रामपंचायतच्या पुढाकाराने लवकरच विद्युतीकरण होणार आहे. गावकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि सरपंचांच्या प्रयत्नांमुळे हे संभवले आहे.
आपली राजकीय प्रतिमा वाढवण्यासाठी, काही संधी-साधू राजकीय पुढारी संधी साधण्याचे प्रयत्न!
गाव ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्रामसभा ग्रामपंचायततील सरपंच,पदाधिकारी यांच्या पुढाकाराने वीज जोडणीला मंजुरी.
दहा ते पंधरा घरांची पाडा, आता होणार रोषणाई!
कोरची (Daihantola Gram Panchayat) : तालुका मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर वसलेला ग्रामपंचायत अरमुरकसा या गावाला लागूनच अरमुकसा या गावचा टोला म्हणजेच दैहानटोला! सहा ते सात वर्षापूर्वी वसलेला गाव आहे. मात्र विद्युत जोडणी नसल्यामुळे येथील लोकांना हलाकीची समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र ग्रामपंचायत अरमुरकसा येथील सरपंच संतानु धिकोडी व ग्रामसभा च्या माध्यमाने वेळो-वेळी ठराव व पाठपुरावा केल्यामुळे आज दैहानटोला (Daihantola Gram Panchayat) या गावाला विद्युत जोडणीची परवानगी मिळालेली आहे. मात्र काही राजकीय पुढारी आपल्या नाव चमकवण्यासाठी काम आम्ही केलं?
अशी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत?
खरं म्हटलं तर या गावात दोन वर्षांपूर्वी कबड्डी प्रतियोगितेचा आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा गाव प्रकाश झोकात आला होता. आणि गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव मांडून सरपंच चा माध्यमाने विद्युत विभागाशी नेहमीच पाठपुरावा करून (Daihantola Gram Panchayat) विद्युत जोडणीच्या कामाला मंजुरी मिळवून घेतलेला आहे. त्यामुळे कोणत्याही पुढारांनी कामाचे श्रेय घेऊ नये. 75 वर्षा पूर्वी गाव वसलेला आहे ही माहिती चुकीची आहे. त्यामुळे आपली वाह! - वाह! करण्यासाठी काही पुढारी काहीतरी बातमी प्रकाशित करतात..