Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

अपहार प्रकरणी खेट्री सरपंचांवर संशय कायम?


अपहार प्रकरणी खेट्री सरपंचांवर संशय कायम

Corruption Allegations |

फेर चौकशीचे आदेश : आरोप गंभीर, विरोधक आक्रमक

पातूर (Corruption Allegations) : पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथील सरपंच जहूर खान यांच्याविरोधातील कथित अपहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अपर आयुक्तांनी दिलेल्या फेर चौकशीच्या आदेशामुळे सरपंचांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील विकास कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचा गंभीर आरोप उपसरपंचांसह ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी २०२३ मध्ये विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. या तक्रारीनंतर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते.

दरम्यान, काही महिन्यांनंतर उपसरपंच व एका सदस्याने सरपंचांनी कोणताही गैरवापर केला नसल्याचे लेखी दिल्याने प्रकरणात वळण आले. मात्र, या बदललेल्या भूमिकेमुळे संशय अधिकच बळावल्याची चर्चा गावात रंगत आहे.

अपर आयुक्तांनी ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत या प्रकरणाची गंभीर दखल घेत, संपूर्ण बाबींची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे प्रकरण अद्याप निकाली लागले नसून सरपंचांवरील आरोपांची छाया कायम आहे.

दरम्यान, सरपंचांना अपात्र ठरविण्यात आल्याची अफवा परिसरात पसरली होती. मात्र अधिकृत आदेशात तसे स्पष्ट नसल्याने ते अद्याप पदावर कायम आहेत. तरीही, या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.
 
विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, "गावाच्या विकासाच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहाराचा पर्दाफाश व्हायलाच हवा," असा सूर उमटत आहे.

"माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे असून राजकीय हेतूने लावले आहेत," असा दावा सरपंच जहूर खान यांनी केला असला तरी, फेर चौकशीच्या आदेशामुळे त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Related to this topic: