Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कोरची तालुका गावे

दोन तालुक्यांच्या सीमेवर अडकले तीन गावे; नागरिकांची दुहेरी धावपळ, योजनांपासून वंचित राहण्याची वेळ

Korachi Taluka villages: कोरची तालुक्यातील गावांमध्ये दोन तालुक्यांच्या सीमा बाधित करण्यात आल्यामुळे नागरिकांना प्रशासनिक कागदपत्रांची माहिती मिळत नाही.


दोन तालुक्यांच्या सीमेवर अडकले तीन गावे नागरिकांची दुहेरी धावपळ योजनांपासून वंचित राहण्याची वेळ

Korachi Taluka villages |

कोरची (Korachi Taluka villages) : दोन तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या गावांमध्ये आजही मूलभूत सुविधा आणि प्रशासनिक सुसूत्रतेचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी नाडेकल, प्रतापगड (गांगीन) आणि बेतकाठी या तीन गावांतील नागरिकांना शासकीय कामांसाठी अक्षरशः दोन तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. या अजब व्यवस्थेमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

कोरची पंचायत समिती अंतर्गत येणारी ही गावे ग्रामपंचायत खोब्रामेंढा (ता. कुरखेडा) अंतर्गत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, गावांची नोंद कोरची तालुक्यात असली तरी तहसील कामकाजासाठी नागरिकांना कुरखेडा येथे जावे लागते. तर पंचायत समितीशी संबंधित कामांसाठी कोरची गाठावे लागते. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या विसंगतीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

मूलभूत सुविधांची वानवा कायम

गावांमध्ये काही प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात नाली, रस्ते, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा या समस्या अद्याप कायम आहेत. वारंवार वीज खंडित होणे आणि तासन्तास दुरुस्ती न होणे ही गंभीर बाब ठरत आहे. तसेच स्वच्छता आणि शुद्ध पाण्याचा प्रश्नही तीव्र आहे.

योजनांच्या लाभात अडथळे

शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आवश्यक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत खोब्रामेंढा, तसेच कोरची व कुरखेडा या दोन्ही तालुक्यांच्या कार्यालयांत वारंवार जावे लागत आहे. त्यामुळे वेळेत कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत आणि अनेकदा पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात.

प्रशासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन एकसंध आणि स्पष्ट प्रशासनिक व्यवस्था निर्माण करावी, तसेच मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.