Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

आमदार श्वेता महाले पाटील

जनता दरबार उपक्रममध्ये तक्रारीच्या सोडवणूकसाठी आ. श्वेता महाले पाटील यांची अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

MLA Shweta Mahale Patil: चिखली विधानसभा मतदारसंघातील आमदार श्वेता महाले पाटील यांनी जनता दरबारात जिल्ह्यातील विविध समस्या मांडण्यावर जोर देण्याचा उपक्रम सुरू केला.


जनता दरबार उपक्रममध्ये तक्रारीच्या सोडवणूकसाठी आ श्वेता महाले पाटील यांची अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

MLA Shweta Mahale Patil |

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालय, चिखली येथे जनता दरबार आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला असून मे महिन्यात झालेल्या पहिल्या जनता दरबारात प्राप्त सुमारे २५० तक्रारींच्या सोडवणुकीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी नुकतीच २७मे रोजी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली. जनतेच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या उपक्रमाची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालय, चिखली येथे पार पडलेल्या पहिल्या जनता दरबाराने झाली. या दरबारात मतदारसंघातील विविध भागांतून नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांसह समाजातील विविध घटकांनी आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडल्या. जमीन, पाणी, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ तसेच महसूल विभागाशी संबंधित अडचणी अशा विविध स्वरूपाच्या तब्बल २५० च्या जवळपास तक्रारी या दरबारात प्राप्त झाल्या. पहिल्याच दरबारात इतक्या मोठ्या संख्येने तक्रारी येणे हे या उपक्रमाची नितांत गरज आणि महत्त्व अधोरेखित करते.

पहिल्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची प्रभावीपणे व वेळेत सोडवणूक व्हावी, यासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी तातडीने पुढाकार घेत तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रत्येक तक्रारीवर काय कार्यवाही झाली, संबंधित विभागाने त्यावर काय निर्णय घेतला आणि तक्रारदार नागरिकाला न्याय मिळाला की नाही, याबाबत आमदारांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर विचारणा केली. कोणत्या तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत, त्या का प्रलंबित आहेत आणि त्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचाही त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) बारकाईने आढावा घेतला.

विशेष म्हणजे, आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट व कठोर शब्दांत आदेश दिले की, पहिल्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा दुसरा जनता दरबार होण्यापूर्वीच, म्हणजेच १ जून २०२६ पूर्वी करण्यात यावा. एकही तक्रार शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी बजावले. तक्रारींची वेळेत सोडवणूक न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदारांच्या या कठोर व जागरूक भूमिकेमुळे प्रशासनात एक नवी कार्यतत्परता निर्माण झाली असून जनतेच्या तक्रारींना प्राधान्याने हाताळले जात आहे.

१ जून रोजी दुसरा जनता दरबार, नागरिकांना आवाहन 

या उपक्रमाची पुढील कडी म्हणून दुसरा जनता दरबार दिनांक १ जून २०२६ (सोमवार) रोजी तहसील कार्यालय, चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे. मतदारसंघातील ज्या नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय तक्रारी, अडचणी किंवा समस्या प्रलंबित आहेत, त्यांनी या जनता दरबारात आपल्या तक्रारी घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले आहे. कोणताही नागरिक या सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी सुरू केलेला हा जनता दरबाराचा उपक्रम म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा एक प्रभावी व अनुकरणीय प्रयत्न आहे. तक्रारी स्वीकारणे एवढ्यापुरतेच न थांबता त्यांचा ठराविक मुदतीत निपटारा करण्याचा आग्रह धरणे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित करणे, हे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण अधोरेखित करते. सामान्य माणसाच्या समस्या सरकार दरबारी पोहोचाव्यात आणि त्यांचे त्वरित निराकरण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम चिखली विधानसभा मतदारसंघात एक नवा आदर्श निर्माण करत आहे...

Related to this topic: