Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

भंगेवाडी धरणे आंदोलन

विहीर पाण्याने भरलेली अन् गावात मात्र निर्जळी!

Bhangewadi Dharne Andolan:गेल्या तीन वर्षांपासून जलजीवन मिशन अंमलात असलेल्या भंगेवाडी गावात, व्हिस्किंग यंत्राचा अभावामुळे पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.


विहीर पाण्याने भरलेली अन् गावात मात्र निर्जळी

Bhangewadi Dharne Andolan |

 

भंगेवाडी ग्रामस्थांचा धरणे आंदोलनाचा इशारा

लातूर (Bhangewadi Dharne Andolan) : औसा तालुक्यातील भंगेवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे कामे करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून विहीर पाण्याने भरून असतानाही   ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या विरोधात ग्रामस्थांनी दि. 24 जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे.

 भंगेवाडी ग्रामपंचायतीने (Bhangewadi Dharne Andolan) गेल्या तीन वर्षांपासून जल जीवन मिशन अंतर्गत विहीर पाण्याची टाकी व घरोघरी नळ योजना राबविलेली आहे. मात्र कंत्राटदारांने विहिरीला विद्युत पुरवठा न केल्यामुळे विहीर तुडुंब भरलेली असतानाही, गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच गेल्या वर्षी नळाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सापाचे तुकडे व इतर जीव जंतू आढळून आल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत इकडे आरो फिल्टर संच उभा करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु ग्रामपंचायतीने त्याबाबत गंभीर दखल न घेता फक्त चालढकल करण्याचे काम केले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीने गेल्या एक वर्षात आरो फिल्टर संच उभारण्यासाठी फक्त एक लोखंडी सांगाडा उभा करून ठेवलेला आहे. त्यामुळे  ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ जलजीवन योजनेअंतर्गत झालेल्या विहिरीतून पाणी उपसा करून गावात दररोज शुद्ध पाणीपुरवठा करावा, खेळाडूंना खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे, बंद असलेले पथदिवे चालू करावे, या मागण्यांसाठी दि. 24 जून पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे.

Related to this topic: