Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

बेडगाव मृत्यू घाट

बेडगाव घाट ठरतोय 'मृत्यूचा घाट'; प्रशासन जागे होणार कधी?

Bedgaon Death Ghat: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा–कोरची–राजनांदगाव–छत्तीसगड राज्य महामार्गावरील बेडगाव घाट सध्या नागरिकांसाठी अक्षरशः 'मृत्यूचा घाट' ठरत आहे.


बेडगाव घाट ठरतोय मृत्यूचा घाट प्रशासन जागे होणार कधी

Bedgaon Death Ghat |

कोरची (Bedgaon Death Ghat) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा–कोरची–राजनांदगाव–छत्तीसगड राज्य महामार्गावरील बेडगाव घाट सध्या नागरिकांसाठी अक्षरशः 'मृत्यूचा घाट' ठरत आहे. या मार्गावर दररोज लोखंड खनिजाने भरलेल्या शेकडो अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः बेडगाव घाटातील तीव्र चढ आणि काही वाहनांवरील कथित अतिभार यामुळे वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या (Bedgaon Death Ghat) घाटात अवजड ट्रक बंद पडणे, मागे घसरणे, रस्त्यावर आडवे होणे किंवा अपघात होणे अशा घटना वाढत आहेत. परिणामी हा मार्ग तासन्‌तास बंद राहतो. याचा फटका कोरची तालुक्यातील शासकीय कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांना बसत आहे. अनेकदा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या (Bedgaon Death Ghat) मार्गावरील अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण, वजनमर्यादेची काटेकोर तपासणी, वाहतूक नियोजन आणि नियमित पोलिस बंदोबस्त यांचा अभाव असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संबंधित यंत्रणेकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याचीही नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे बेडगाव घाटाचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याची, अतिभार वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची, धोकादायक वळणांवर संरक्षक उपाययोजना वाढविण्याची, वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी केली आहे.

प्रश्न एकच आहे—आणखी किती अपघात आणि किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? बेडगाव घाटाला 'मृत्यूचा घाट' बनण्यापासून वाचविण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे.

Related to this topic: