Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग; जीवितहानी टळली

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. A


आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग जीवितहानी टळली

Aheri Fire Incident |

अहेरी (Aheri Fire Incident) : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित राहिली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान उन्हाचा तीव्र तडाखा आणि विजेच्या दाबातील चढ-उतार यामुळे कार्यालयात शॉर्टसर्किट झाले. त्या वेळी कार्यालय सुरू होते आणि कर्मचारी तसेच काही नागरिक उपस्थित होते. अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि एका इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागली. त्यामुळे कार्यालयात धुराचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखली गेली. आगीमुळे कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चालीगंजेवार यांनी स्पष्ट केले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, कार्यालयातील कामकाज सुरू असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. सुट्टीचा दिवस असता तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, अशी चिंता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related to this topic: