Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

न्याय द्यावा व नुकसान भरपाई द्यावी

अज्ञात व्यक्तीने लावली आग; आंबा झाडे जळून खाक

मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेल्या १ एकर शेतात दि. १५ मार्च रोजी अज्ञात इसमाने आग लावल्याने आंबा झाडे जळून खाक झाली आहेत.


अज्ञात व्यक्तीने लावली आग आंबा झाडे जळून खाक

Mango Trees Fire |

मानोरा (Mango Trees Fire) : धामणी (मानोरा) शिवारातील गट क्रमांक २१ मधील मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेल्या १ एकर शेतात दि. १५ मार्च रोजी अज्ञात इसमाने आग लावल्याने आंबा झाडे जळून खाक (Mango Trees Fire) झाली आहेत. यासंदर्भात न्याय द्यावा व नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन नुकसानग्रस्त शेतकरी नीरज सुधीर पाटील यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व ठाणेदार यांना दिले आहे. 

निवेदनात नमूद केले आहे की, मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत एका एकर शेतात मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग आंबा झाडांची लागवड शेतकरी नीरज पाटील यांनी केली आहे. १५ मार्च रोजी अज्ञात इसमाने १ एकर आंबा फळबाग लागवड असलेल्या शेतात जाणूनबुजून (Mango Trees Fire) आग लावल्यामुळे शेतीमधील आंब्याची झाडे जळून खाक झाली आहे. संपूर्ण फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसानीचा पंचनामा करून शासनाची नुकसान भरपाई द्यावी व जाणूनबुजून आग लावणाऱ्या अज्ञात इसमाविरुध्द कार्यवाही करावी असे निवेदन बाधीत शेतकऱ्यांनी दिले आहे.