शोच्या प्रीमियरपूर्वी प्रिया बापट, उमेश कामत यांनी अनुभवला अविस्मरणीय क्षण
“हे काय नवीन?” च्या प्रमोशनसाठी नागपूरात आगमन
नागपूर (Priya Bapat-Umesh Kamat) : नागपूरमधील मराठी मनोरंजनप्रेमींना ज्याला ऑरेंज सिटी म्हणूनही ओळखले जाते. एक अविस्मरणीय अनुभव मिळाला, जेव्हा प्रसिद्ध कलाकार प्रिया बापट आणि उमेश कामत (Priya Bapat-Umesh Kamat), दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्यासह, त्यांच्या आगामी मराठी ZEE5 शो “हे काय नवीन?”च्या प्रमोशनसाठी शहरात आले. हे खऱ्या आयुष्यातील जोडपे शोमध्ये एका विवाहित जोडप्याची भूमिका साकारताना दिसणार असून, जीवनातील नव्या आणि महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाताना कथेला एक खरी भावनिक खोली देतात. प्रतिसाद प्रॉडक्शन्स आणि बहावा एंटरटेनमेंट निर्मित, ‘हे काय नवीन?’चे कथासूत्र रमा आणि आदित्यभोवती फिरते. एक आधुनिक, आयुष्यात सेटल झालेले जोडपे ज्यांनी समोर आलेला प्रत्येक प्रश्न सोडवला आहे. एक उबदार घर, स्थिर कारकीर्द, पाठीशी भक्कमपणे उभे असलेले कुटुंब तसेच 10 वर्षांच्या निवांत आणि समजूतदारपणावर उभं असलेलं लग्न. पण जेव्हा ते एका नवीन अध्यायात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्यात एक अनपेक्षित प्रश्नाचा हुंकार होऊ लागतोः ‘हॅप्पीली एव्हर आफ्टर’ नंतर पुढे काय?
जसजशी नवीन मैत्री, बदलणारे आयाम आणि इतर प्रत्येकाच्या “परिपूर्ण कालमर्यादेचे” वजन तिच्या जगावर प्रभाव टाकू लागते, तसतसे हे जोडपे त्यांच्या नात्याची अशा प्रकारे परीक्षा घेणाऱ्या निर्णयांसमोर उभे राहते, ज्याची त्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती. विनोद, उबदारपणा आणि तीक्ष्ण भावनिक अंतर्दृष्टी यांचे मिश्रण असलेली ही सिरीज ओळख, वाढत्या महत्त्वाकांक्षा, भागीदारी आणि जीवन बाहेरून ‘पूर्ण’ दिसत असताना समोर येणाऱ्या न बोलल्या गेलेल्या अस्वस्थतेचा शोध घेते. वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स निर्मित ही सिरीज आधुनिक नातेसंबंधांवर एक ताजं दृष्टिकोन मांडते, जिथे प्रेम फक्त स्थैर्यापुरतं मर्यादित नसून वाढ आणि नव्याने स्वतःला घडवण्याची प्रक्रिया देखील आहे. आपला अनुभव सांगताना प्रिया बापट (Priya Bapat) म्हणाली, “नागपुरात कायमच आपलेपणाची ऊब जाणवते आणि हा दौरा माझ्याकरिता विशेष अर्थपूर्ण ठरला. इथल्या प्रेक्षकांशी रमाच्या रुपात संवाद साधणे खूप आनंददायी होतं. माझ्या वास्तविक जीवनातील जोडीदारासोबत महाराष्ट्रभर या सिरीजचा प्रचार करताना आणि ऑन-स्क्रीनही एक जोडपं साकारताना हा प्रवास आणखी खास ठरला. रमाची व्यक्तिरेखा अनेक स्त्रियांना लगेच आपलीशी वाटेल, कारण ती विलक्षण नाही तर खरी आहे. जेव्हा महत्त्वाकांक्षा, ओळख आणि जबाबदाऱ्या एकमेकांशी भिडतात, तेव्हा निर्माण होणाऱ्या भावनिक वळणांचं ती प्रतिनिधित्व करते. रमा साकारताना दीर्घकालीन नात्यांमध्ये आपण अनेकदा दडवून ठेवणाऱ्या शांत प्रश्नांचा शोध घेता आला, ‘मला पुढे काय हवं आहे?’ आणि ‘माझ्या स्वतःच्या कथेत माझं स्थान कुठे आहे?’ ‘हे काय नवीन?’ त्या भावनांना आवाज देते. अशा प्रामाणिक कथेला पाठबळ दिल्याबद्दल मी ZEE5ची आभारी आहे आणि प्रेक्षकांनी ही कथा अनुभवावी यासाठी मी उत्सुक आहे.” आपल्या भूमिकेबद्दल बोलताना उमेश कामत (Umesh Kamat) म्हणाले, “‘हे काय नवीन?’कडे मला आकर्षित करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिरीजने विवाहाच्या त्या टप्प्याचं अत्यंत वास्तववादी चित्रण केलं आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. आदित्यचा प्रवास सूक्ष्म, अनेक पैलू असलेला आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध आहे. मराठी ZEE5 नेहमीच प्रेक्षकांना जोडणाऱ्या अर्थपूर्ण कथांसाठी ओळखलं जातं आणि अशा संवेदनशीलतेने दैनंदिन नातेसंबंध मांडणाऱ्या सिरीजचा भाग असल्याचा मला आनंद आहे. नागपुरातील उत्साह विलक्षण होता. लोकांना भेटणे, त्यांचे विचार ऐकणे आणि त्यांना सिरीजची झलक देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला. प्रेक्षकांसोबत रिलीजपूर्वीच संपर्क साधण्याचा अनुभव नेहमीच खास असतो. ‘हे काय नवीन?’ मराठी ZEE5वर कधी एकदा सुरू होईल, याची आतुरतेने वाट पाहतो आहे.” दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले, “मराठी ZEE5ने प्रामाणिक आणि भावनिकदृष्ट्या सत्य वाटणाऱ्या कथांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ‘हे काय नवीन?’ हा त्या सर्जनशील स्वातंत्र्याचा परिणाम आहे. आम्हाला वास्तविक जीवनाच्या जवळची, साधी, प्रामाणिक आणि सखोल मानवी कथा सांगायची होती. आदित्य आणि रमाचा प्रवास विवाहातील उद्देश तसेच संबंध पुन्हा शोधण्याबद्दल आहे. मला वाटते की अशा जिव्हाळ्याच्या कथेसाठी मराठी ZEE5 मंच योग्य आहे.” जीवन आणि नातेसंबंधांमध्ये येणाऱ्या छोट्या-छोट्या सरप्राइझचा अनुभव घ्या ‘हे काय नवीन?’सोबत, जी 31 मार्चपासून मराठी ZEE5वर स्ट्रीम होणार आहे।