Child Health Check-up: हिंगोली जिल्हा रुग्णालयात र

हिंगोली जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल आरोग्य तपासणी शिबिरात १० बालकांची मोफत 2D-इको तपासणी

Child Health Check-up

२० विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित

हिंगोली (Child Health Check-up) : येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वतीने ० ते १८ वर्ष वयोगटातील हृदयरुग्णांसाठी विशेष 2D-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ९ सप्टेंबर  रोजी पार पडलेल्या या शिबिरात ठाणे येथील KIMS रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल. पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, विजय खरात आणिउल्हास पाटील यांनी तपासणी केली.

या (Child Health Check-up) शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विजय गायकवाड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या हस्ते झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी विशेष भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. दत्ता दुधुळे, डॉ. स्नेहल नगरे आणि सौ. जोशी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यांतील १० संशयित हृदयरुग्ण बालकांची या शिबिरात सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० विद्यार्थ्यांना पुढील हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. संदर्भित विद्यार्थ्यांवर महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ठाणे येथील KIMS रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झालेल्या आणि योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना डॉ. नितीन तडस यांनी जिल्ह्यातील सर्व पालकांना आवाहन केले की दैनंदिन जीवनात मुलांमध्ये हृदयाचे आजार आढळल्यास वेळोवेळी 2D-इको तपासणी करून घ्यावी आणि आजाराचे लवकर निदान करून उपचार करावेत.

या यशस्वी शिबिरासाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. गाभणे लक्ष्मण, डीआयसी व्यवस्थापक डॉ. संतोष नांदूरकर, अधिपरिचारिका श्रीमती शिंदे, परिचारिका श्रीमती कदम यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.