हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात

हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

Nilgai Rescue

हिंगोली (Nilgai Rescue) : हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवून सर्व निलगायांना सुरक्षित बाहेर काढत त्यांना जीवदान दिले.

विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे आणि उपवनसंरक्षक माने यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनमजूर संग्राम भालेराव, राऊत तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि प्राणीमित्रांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर सर्व निलगायांना शेततळ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

प्रथमोपचार केल्यानंतर सर्व निलगायांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाच्या या तत्पर कारवाईमुळे चार मुक्या जीवांना जीवदान मिळाले असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेततळ्यांकडे येत असल्याने अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळ्यांभोवती संरक्षक जाळी किंवा काटेरी कुंपण उभारावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.